Friday, 18 March 2022

After #TheKashmirFiles

So Finally I hit the theatre after many years to watch #TheKashmiriFiles  

Lot of friends have already said a lot from politics to emotions on this. So I will not talk about that. 

My friend Kichu Kannan needs a mention. With all the posts and earlier readings of all aspects as well as my love for Kashmir strengthened by Kashmir Shaivism, which played a big role in turning my life around, I was mentally ready to face somewhat. But his post this morning - about facing it with cold heart and relating it to fight we all have lingering in our mind, fight which is going on in our life in many forms - prepped me to see it finally. And now I know what he meant 🙏 

Yes this is about acknowledging the pain of a community. It is about justice. Its about standing again with pride and sense of security. 

But beyond that one thought that is lingering on mind is what this share is about. 

सरकार उनकी होगी पर सिस्टम तो हमारा हैं 

That's the take away in more than one sense. 

Justice for some is about retribution, a sense of pay back, a sense of closure, a chance to live again with less stress. But when we speak of a community a civilisation a संस्कृती its beyond this meaning of justice. We lose something to others' sense of power, their bloodthirst of wiping off others. And that something is not a flavour of the season. Its what generations of life, struggles, curiosity, research, dedication, collaboration, expression has built into structure. A structure that gives our life a meaning from survival, health, culture, happiness, actualisation of potential. 

And that's why it's not justice but the system that we need to look for. A system that will ensure the KP and their existence is not left just a matter or museum or documentation for research, validation, arguments. The existence (like Krishna's last speech) means a complete heritage that needs to stand again. Because that's what life is all about. 

At the same time all others need to learn to differentiate people who are looking to annihilate all such knowledge and life because they are hungry for power for the sake of it. They are using state also as a decoy villain for their own much more evil controlling design. They are not in this for any love of life but are actively working to snuff out life from everything that matters. And they are in it because being on this side is remunerative. From jungle bunglows, parties, scholarship, awards to much sinister "industries". 

Countering them is important. At every corner, in every possible way. But more important is to ensure we dont let our young and our lives be a plaything for them. Our knowledge, life, culture, traditions and every life affirmation and expression needs to be protected from these vultures.

Monday, 16 August 2021

निरोप - कुसुमाग्रज

निरोप - कुसुमाग्रज

गर्दीत बाणासम ती घुसोनि
चाले, ऊरेना लव देहभान
दोन्ही करांनी कवटाळूनीया
वक्ष:स्थळी बालक ते लहान

लज्जा न, संकोच नसे, न भीती
हो दहन ते स्त्रीपण संगरात
आता ऊरे जीवनसूत्र एक
गुंतोनी राहे मन मात्र त्यात

बाजार येथे जमला बळींचा
तेथेही जागा धनिकांस आधी
आधार अश्रूसही दौलतीचा
दारिद्र्य दु:खा दुसरी उपाधी

चिंध्या शरीरावरी सावरोनी
राहे जमावात जरा उभी ती
कोणी पहावे अथवा पुसावे?
एकाच शापातून सर्व जाती

निर्धार केला कसला मानसी
झेपाउनी ये ठिणगीप्रमाणे
फेकूनिया बाळ दिले विमाने
व्हावे पुढे काय प्रभूच जाणे

"जा बाळा जा, वणव्यातुनी या
पृथ्वीच आई पुढती तुझी रे
आकाश घेईं तुजला कवेंत
दाही दिशांचा तुज आसरा रे"

ठावे न कोठे मग काय झाले
गेले जळोनीं मन मानवाचे
मांगल्य सारे पडले धुळीत
चोहीकडे नर्तन हिंस्त्रतेचे!

Thursday, 16 July 2020

पाळीचे त्रास: गर्भनिरोधक गोळ्यांचे परिणाम

मुलींनो/महिलांनो कृपया हे आर्टिकल पूर्ण वाचा.

©अंजली झरकर

तिला १३ व्या वर्षी पाळी सुरु झाली होती पण जशी सुरु झाली तेव्हापासून काही ना काही दुखणी मागे लागलीच होती. अति रक्तस्त्रावाचा त्रास तर पहिल्या वेळेपासून च सुरु झालेला होता. शाळेत जेव्हा ती आजूबाजूच्या मुलींचं निरीक्षण करायची तेव्हा सगळ्या मुली तिला सुंदर दिसायच्या. उत्साही, तजेलदार त्वचेच्या, शिडशिडीत शरीरयष्टीच्या तिच्या मैत्रिणी बघून तिला कळायचं नाही त्यांच्यात आणि आपल्यात काय नक्की अंतर पडलय. या ही मोठ्याच झाल्यात. यांनाही पाळी सुरु झालेली असणारेय पण यांचे केस गळत नाहीत, यांची स्कीन काळी कुरूप पडलेली नाही, यांचं वजन वाढलेलं नाही मग मी अशी का झालेय? मला का कोणत्या गोष्टीत उत्साह वाटत नाही? मला हे अचानक डिप्रेशन कुठून येतं?

या विषयावर तिच्याशी बोलायला तेव्हा कुणीही नव्हतं. स्वत:च्या मनात पडणारे प्रश्न कुणाला सांगावे? ना कुणी मैत्रीण, ना समुपदेशक, ना शिक्षिका. तिने या विषयावर आईशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला पण बाहेरच्या १२-१२ तासाच्या हेवी ड्युट्या करून आणि घरातील कामे करून शिणून थकून गेलेली आई तिच्याशी बोलायला राजी नसायची.
“सगळ्या जगाचं असच असतं, तू काय आभाळातून पडली नाहीस, मी ही हेच सहन केलय, तुला ही तेच सहन करायचय.” तिच्या मनातलं प्रश्नाचं जाळं कायम ठेवून आई – मुलीचा संवाद आटपायचा.

ती १० वी ला गेल्यावर हा त्रास प्रचंड वाढला. दर १० दिवसांनी, १५ दिवसांनी कधीही पाळी यायला लागली, इडलिंबू असते तितक्या मोठ्या आकाराच्या रक्ताच्या काळ्या गाठी पाळीतून पडायला लागल्या, ते बघून तिचा जीव घाबरा घुबरा व्हायचा, असह्य वेदनांनी ८ -८ दिवस पाळी संपेपर्यंत ती बिछान्यावर निपचित पडून रहायची. शेवटी अनेकदा रडल्यानंतर तिला आई दवाखान्यात घेवून गेली. तिथे तिला overol-L चं प्रिस्क्रिप्शन मिळालं. इथून खरे दुर्दैवाचे दशावतार सुरु झाले.

overal-L या गोळ्या तिने पहिल्या तीन महिने खाल्ल्या तरीही तिच्या पाळीची सायकल नॉर्मल होईना म्हणून पुन्हा एकदा ३ महिन्यासाठी तिला त्याच गोळ्या प्रिस्क्राईब केल्या गेल्या. ६ व्या महिन्यात एके दिवशी तिने overal-L चा डोस घेतला. ४ तासात अचानक गर्रकन सगळ जग तिच्याभोवती फिरायला लागलं, प्रचंड रक्तस्त्राव सुरु झाला, हृदयाच्या हार्ट्सबीट जबरदस्त वाढल्या. गोळी घेतल्यापासून ६ तासात तिची कंडीशन सिव्हीयर झाली. त्याच्यानंतर जवळपास ३ महिने बिछान्याला ती खिळून होती. याबद्दल जेव्हा दुसऱ्या MBBS MD. डॉक्टरांचं ओपिनियन घेतलं गेलं तेव्हा तिने overal-L चा डोस घेतला हे ऐकून डॉक्टर उखडले. तिच्या आईला ताडताड बोलले.

“ कमाल आहे तुमची, १५ वर्षाच्या मुलीला कोणी ६ महिने contraceptive pills वर ठेवतं का? बघा तिची अवस्था काय झालीयेय. किती भयानक वजन वाढलंय, pcod ची कंडीशन पहिल्यापेक्षा गंभीर झाली आहे. गंभीर साईड इफेक्ट झालेत या गोळ्यांचे. बंद करा त्या गोळ्या पहिल्या. वाचवा तुमच्या मुलीला”

तिच्या गोळ्या बंद झाल्या पण गोळ्यांचे परिणाम कायम पाठलाग करत राहिले. ८५ किलो वर गेलेलं वजन, संपूर्ण चेहऱ्यावर उगवलेले केस, सतत मुरुमांच्या गाठी येवून खडबडीत झालेला काळा चेहरा, संपूर्ण शरीरावर आलेली सूज, खोबणीतून बाहेर आलेले डोळे आणि आयुष्यभरासाठी भेट मिळालेलं डिप्रेशन.

ही कथा एकट्या कस्तुरीची नाहीयेय. ही कथा त्या हर एका मुलीची आहे जी वयाच्या १२ व्या १३ व्या वर्षापासून तिच्या पाळीबरोबर झगडतेय.

overal-L असं जर तुम्ही नेट वर सर्च करून पाहिलं तर तुम्हाला कळेल या गर्भनिरोधक गोळ्या आहेत.
पण...पण
या गोळ्या मुलींची पाळीची सायकल नॉर्मल व्हावी म्हणून देखील सर्रास दिल्या जातात. काही डॉक्टर या देतात. बरेच डॉक्टर या गोळ्यांचा विरोध करतात. कारण या गोळ्या म्हणजे फक्त कृत्रिम इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रोन हे हार्मोन आहेत. बाईच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रोन naturally तयार होत नाही म्हणून पिरिअड वेळेवर येत नाहीत. ही सायकल जर बिघडली तर तिला पाळीचे त्रास सुरु होतात त्याची ट्रीटमेंट म्हणून बऱ्यापैकी birth control pills किंवा गर्भनिरोधक गोळ्या प्रिस्क्राइब केल्या जातात पण खुद्द अनेक डॉक्टर या गोळ्या लहान टीन एज मुलींना देण्याचा विरोध करतात कारण कृत्रिम इस्ट्रोजेन घेवून प्रोब्लेम कधीच संपत नाहीत. गोळ्या बंद केल्यावर अजून जास्त वाढतात. गंभीर बनतात जसे कस्तुरीचे बनले.

जरा एकदा आपल्या घरातल्या १३-१४ वर्षाच्या मुलीबरोबर पाळीच्या त्रासाबद्दल बोलून बघा, तिला नक्की कुठले मेडिसीन दिलेत त्याचा काय परिणाम होतो हे सर्च तर करून बघा. १४ वर्षाचा जीव कुठल्या वेदनेतून आणि दु:खातून चाललाय याची जाणीव तुमच्या मनापर्यंत पोहोचू द्या भारताच्या जागरूक आई बापांनो. जर पाळीच्या त्रासासाठी birth control pills, कृत्रिम इस्ट्रोजेन, T4 किंवा स्टेरॉईड कंटेंट असलेली औषधे तिला चालू असतील तर कृपा करून ती बंद करा.

दुसरा मुद्दा आहे पाळी बरोबर येत नसल्याने वजन वाढून आलेल्या लठ्ठपणाच्या वेदनांचा. कुणी choice म्हणून जाड होत नाही. कुणी choice म्हणून कुरूप देखील होत नाही. मग असं असताना जाडपणाच्या वेदना घेवून चालणाऱ्या बाईला ढोली, जाडी, काळी, कुरूप, जम्बो असली विशेषणे कोणत्या तोंडाने हा पुरुषी समाज लावत असतो? कामाच्या ठिकाणी स्वत:पेक्षा अनेक वर्षाने लहान असणाऱ्या ज्युनियर च्या वाढलेल्या पार्श्वभागावर विनोद करणारे सिनियर्स मला ठावूक आहेत. come on! या वेळी कुठे जाते तुमची डिग्री, तुमचं उच्च शिक्षण, तुमचं गोल्ड मेडल, तुमचे एथिक्स? माहीत नाही उच्च नीच जात कदाचित जन्माने मिळत असेल ही पण दुसऱ्याची वेदना समजावून घेणारं संवेदनशील मन फार दुर्मिळ आहे ते जन्माने मिळेलच असं नाही.

त्यामुळे बाईला देवळात पाळीत प्रवेश द्यावा किंवा नाही ह्यावर भांडत बसणारा समाज मला कायम मुर्ख वाटत आलाय. बाईला पाळीमध्ये घरकामाची सक्ती नाही केली पाहिजे, बाईला पाळीमध्ये कामाच्या ठिकाणी स्वच्छ toilets उपलब्ध करून दिले पाहिजेत, बाईने स्वत:च्या पाळीच्या त्रासाबद्दल उघडपणे बोलले पाहिजे, पाळीबद्दल जनजागृती केली गेली पाहिजे, पाळीमध्ये बाईला कुठल्या प्रकारची औषधे दिली तर तिला बरं वाटेल, कुठल्या प्रकारच्या औषधानी तिचा त्रास वाढू शकतो याबद्दल कधी कुठली चर्चा ऐकू येत नाही. ज्या गरीब मुलींची ऐपत नाही त्यांना चांगल्या दर्जाचे सॅनिटरी पॅड पुरवले गेले पाहिजेत, बाईला स्वच्छ toilets तिच्या कामाच्या परिसरात असावी याबद्दल कुणी आंदोलने करत नाही. ज्याला त्याला जावून फक्त गाभाऱ्याला धडका मारायच्या असतात.
हे बघा भाई मला पाळीत ना देवळात जायचय, ना मशिदीत, ना चर्च मध्ये. मला घरात राहायचय, मला आराम करायचाय, मला माझी पाळी वेदनामुक्त जगायची आहे. मला pcos free असं हेल्दी लाईफ जगायचं आहे त्यासाठी तुम्ही माझी काय मदत करू शकता? हा माझा जाहीर सवाल आहे!

- अंजली झरकर

Thursday, 31 May 2018

अहिल्याबाई होळकर

वंदनीय  अहिल्याबाई  होळकर
         अहिल्याबाईंचं नाव  माहीत नाही अशी व्यक्ती महाराष्ट्रातच नव्हे तर उभ्या हिंदुस्तानात सापडणं दुर्मिळ आहे. पेशव्यांचे अत्यंत शूर, हुशार आणि दिलदार सरदार मल्हारराव होळकर यांच्या या सुनबाई. पण अहिल्याबाईंची ओळख इतकीच मर्यादित नाही. त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख आहे जी त्यांनी त्यांच्या दीर्घकालीन दैदिप्यमान कर्तृत्वातून निर्माण केली आहे. आपल्या शालेय इतिहासात ती आपल्याला कधीच शिकवली जात नाही.
         इंदोरचे मल्हारराव होळकर हे अतुल्य पराक्रमी आणि उत्कृष्ट शासक होते. त्यांची न्यायपद्धती, कराची रचना, रयतेवरचं प्रेम, धर्मनिष्ठा  सगळं काही अगदी वाखाणण्याजोगं होतं. पण या पहाडासारख्या पुरुषाला सलणारं आणि छळणारं एक दुःख होतं – ते म्हणजे त्यांचा लेक खंडेराव. खंडेराव म्हणजे हिऱ्याच्या खाणीत जन्मलेला कोळसाच जणू. त्याला हरतऱ्हेची व्यसनं होती. चंगीभंगी राहण्यासाठीच जणू त्याचा जन्म झाला होता. राज्यकारभारात त्याचं मुळीच लक्ष्य नव्हतं. खंडेरावाच्या या वर्तणुकीनं त्याची पत्नी अहिल्या सुद्धा कष्टी झाली होती.
        पण अहिल्या मोठी गुणाची बाई. मल्हाररावांसारख्या मुरब्बी सरदाराला आपल्या सुनेचे बावनकशी गुण दिसले नाहीत तरच नवल. अहिल्याबाईंच्या गुणांमुळे त्या मल्हाररावांच्या लाडक्या तर होत्याच, शिवाय त्यांच्या आशेचं एकमेव स्थान होत्या.
       सासरा आणि सून दोघंही हुशार, महत्वाकांक्षी  आणि जिद्दीचे. मल्हाररावांना अहिल्याबाईंचे गुण लक्षात येऊ लागताच त्यांनी अहिल्याबाईंना राज्यकारभारात सामील करून घ्यायला सुरुवात केली. न्यायनिवाडा कसा करायचा, सैन्याची मोजणी करताना हत्ती आणि घोडेही कसे मोजायचे, मधमाश्या फुलाला इजा न करता मध गोळा करतात त्याप्रमाणे प्रजेला नाराज  न करता कर कसा गोळा करायचा, हाताखालच्या लोकांकडून कामं कशी करून घ्यायची, हिशोब कसा चोख ठेवायचा या सर्व गोष्टी अहिल्याबाई मल्हाररावांच्या तालमीत शिकल्या. अहिल्याबाईंच्या सासूबाई गौतमीबाई या सुद्धा चतुर होत्या. त्यांचीही मदत या दोघांना मिळाली. हळूहळू मल्हारराव दौऱ्यावर जाताना महत्वाच्या जबाबदाऱ्या अहिल्याबाईंवर सोपवून जाऊ लागले.
       अहिल्याबाईंच्या पतीचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांचं वय अवघं २९ वर्षांचं होतं. मल्हाररावांच्या आग्रहामुळं त्या सती (मुगल काळात शीलाच्या भयानं स्त्रिया सती जात. त्यापूर्वी जात नसत.) गेल्या नाहीत. मात्र त्यांचं पुढील आयुष्य त्यांनी अत्यंत व्रतस्थपणे काढलं. त्या पांढरं शुभ्र नऊवारी लुगडं नेसत. दागिना म्हणून गळ्यात केवळ एक सर असे. एका घोंगडीवर त्या झोपत आणि केवळ शाकाहार घेत. अहिल्याबाई खूप धार्मिक होत्या. वेगवेगळ्या प्रकारच्या सत्तर पोथ्यांचा संग्रह त्यांच्याकडे होता. राज्यकाराभारातून  वेळ मिळेल तेव्हा त्यांच्या जप-जाप्य, व्रत-वैकल्य, दानधर्म, पोथीवाचन यात त्या खंड पडू देत नसत.
      मल्हाररावांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सगळी जबाबदारी अहिल्याबाईंवर येऊन पडली. ज्या काळात हिंदुस्तानाबाहेरच्या जगात स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला नव्हता, स्त्री म्हणून सन्मान नव्हता,  पुरुषांपेक्षा जास्त तास काम करूनही कमी पगार मिळत होता, महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता...  त्या काळात हिंदुस्तानात अहिल्याबाई राज्य करून इतिहास घडवत होत्या. आपल्या राष्ट्रातील नारीशक्तीचं आणि स्त्री सन्मानाचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे वंदनीय अहिल्याबाई!
      सर्वप्रथम त्यांनी करवसुलीचं काम स्वतःकडे घेतलं. त्याकाळी एकाच व्यक्तीकडे अनेक गावांच्या करवसुलीचा अधिकार असे. त्यामुळं अधिकारी मनमानी करत. त्यांना पैश्याचा लोभ निर्माण होई. मग ते रयतेवर अन्याय करत आणि धनाढ्य होत. अहिल्याबाईंनी  ही प्रथा बंद केली. त्यांनी थेट रयतेकडून कर घ्यायला सुरुवात केली. त्यांनी रयतेला आव्हान केलं, “आपल्या कमाईचा एक चतुर्थांश हिस्सा करस्वरुपात देणं हे मल्हारी मार्तंडाचं काम आहे. भगवंताचं देणं आहे.” अशी दानाची पवित्र भावना लोकांच्या मनात निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या.  करातून आलेल्या या धनाचा सदुपयोग करण्यात तर अहिल्याबाईंचा हात कोण धरणार? रामेश्वर, मल्लिकार्जुन, बालाजी गिरी, गोकर्ण महाबळेश्वर, पशुपतेश्वर, द्वारका, जगन्नाथपुरी, परळी वैजनाथ, त्र्यंबकेश्वर, जेजुरी, बद्रिकेदार, ओंकारेश्वर, काशी विश्वेश्वर, उज्जैन, पंढरपूर, भीमाशंकर, रामपंचवटी अश्या कैक धार्मिक क्षेत्रांना त्या गंगाजळी म्हणजे आर्थिक निधी पाठवत. अनेक धार्मिक क्षेत्रांवर त्यांनी  नदीवर घाट बांधले, मंदिरं बांधली, धर्मशाळा बांधल्या. कित्येक ठिकाणी पाणपोया सुरु केल्या. कित्येक क्षेत्रांत त्या अन्नछत्र चालवत जिथे गरजू लोक जेवून जात. गावागावात त्यांनी सरकारी खर्चानं विहिरी बांधल्या.
    अहिल्याबाईंनी शेतकऱ्यांना बी-बियाणं आणि अवजारं पुरवली. शेतीला उत्तेजन दिलं. शेती उत्पन्नावर आधारित कर आकारणी केली. त्यामुळं शेतकरी खुश झाले. ‘मेहनत माणसाची आणि दौलत भगवंताची’ ही भावना त्यांनी लोकांमध्ये रुजवली. त्यातून व्यापार उदीम वाढला.  अश्या प्रकारे गरिबांच्या अन्न आणि पाणी या गरजा पूर्ण करण्याची सोय त्या धार्मिक मार्गातून करत होत्या. त्यासाठी त्यांनी आपल्या राज्याबाहेरील क्षेत्रांना सुद्धा मदत केली.
    योग्य न्यायदान देण्याबाबात अहिल्याबाईंचा विशेष नावलौकिक होता. अयोध्या, उदयपूर, कोटा, ग्वाल्हेर, जयपूर या परिसरात त्यांच्या न्यायदानाची ख्याती होती. त्याकाळी पतीनिधनानंतर स्त्रिया नातलगांच्या आधारे जगत. निपुत्रिक आणि वैभवसंपन्न स्त्रिया पुत्र दत्तक घेत, पण त्यासाठी त्यांना सरकारदरबारी काही रक्कम भरावी लागे. एकदा सिरोज परगण्यातील खेमदार सावकाराच्या विधवा स्त्रीला  दत्तक  घेण्याची इच्छा झाली. तिला दत्तक मंजूर करताना तिथल्या कमाविसदारानं  भरपूर  माया जमवली. अहिल्याबाईंना हे कळताच त्यांनी त्या कमाविसदाराला बडतर्फ केलं, त्याला दंडही केला. सावकार स्त्रीला त्यांनी सर्व संपत्ती लोकोपयोगी कामात उपयोगात आणण्याचा सल्ला दिला.
    रयतेला त्रास देणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळ्या, राज्यावर हल्ले करणारे आजूबाजूचे राजे, अंतर्गत बंडाळी करणारे असंतुष्ट घातकी लोक या सर्वांना अहिल्याबाईंनी पाणी पाजलं होतं. पेशवाईत त्यावेळी साडेतीन शहाणे होते. त्यापैकी महादजी शिंदे आणि नाना फडणवीस या दोघांना अहिल्याबाईंनी गप्प केलं होतं.
    अहिल्याबाईंना माणसांची पारख होती आणि बऱ्याच लोकांचा  विश्वास संपादन करण्यात त्यांना यश मिळालं होतं. त्यांनी नेमलेले प्रशासकीय अधिकारी हुशार, प्रामाणिक आणि कर्तबगार होते. ते अहिल्याबाईंशी एकनिष्ठ होते. १७८० साली अहिल्याबाईं आणि त्यांचा विश्वासू सरदार तुकोजी होळकर यांचं थोडं बिनसलं. त्यानंतर तुकोजीचा कारभारी नारो गणेश यानं अहिल्याबाईंच्या विरुद्ध सैनिकी उठाव करण्याचा  प्रयत्न केला. पण एकही सैनिक त्याला साथ द्यायला तयार झाला नाही. सैनिकांना अहिल्याबाईंच्या प्रति ही अशी आत्यंतिक आत्मीयता आणि निष्ठा होती.
     अहिल्याबाईंच्या मुलाच्या मृत्युनंतर त्यांना दत्तक वारस घेण्याची वेळ आली. या परिस्थितीचा फायदा घेण्याचा विचार करून राघोबादादांनी अहिल्याबाईंच्या सल्लागाराला वश करून घेतलं आणि त्यांच्याकडे मोठ्या खंडणीची मागणी केली. खंडणी दिली नाही तर हल्ला करण्याची धमकी दिली. पण अहिल्याबाई मोठ्या झुंजार वृत्तीच्या. त्यांनी महिलांची पलटण तयार केली. (हिंदुस्तानातील ही महिलांची पहिली पलटण असावी.)  शिंदे, नागपूरकर भोसले, गायकवाड या सरदारांना त्यांनी आपल्या बाजूला वळवलं. आपल्या अत्यंत विश्वासू वकिलामार्फत झाला प्रकार माधवराव पेशव्यांच्या कानावर घातला. माधवरावांनी राघोबांना परत फिरण्याचे आदेश दिले. मोठ्या शत्रूला सुद्धा या वाघिणीनं अश्या रीतीनं नमवलं.
      संतवृत्तीच्या, प्रजाहितदक्ष, मुत्सद्दी, दानशूर, धार्मिक, प्रजेसाठी मातृहृदयी, गुन्हेगारांसाठी कठोर, राजकारणात कुशल, शूर, लढवय्यी, दूरदर्शी असलेल्या अहिल्याबाईंनी इंग्रजांचा धोका खूप लवकर  ओळखला होता.
     वयाच्या सत्तर वर्षांपर्यंत म्हणजे सुमारे एक्केचाळीस वर्षे त्यांनी राज्यकारभार केला. त्यांच्या आजारपणात सुद्धा त्यांनी प्रजेकडे दुर्लक्ष केलं नाही.
     अत्यंत क्लेशदायक अश्या वैयक्तिक आयुष्यात व्रतस्थ राहून, दानधर्म करून केवळ प्रजेच्या हिताचा विचार करणारी ही राणी प्रात:स्मरणीय आणि वंदनीय आहे.
    आपला हा (आणि असा) प्रेरक आणि अभिमानास्पद आम्हाला शालेय जीवनात का शिकवला जात नाही हा खरा प्रश्न आहे.

-------
वैद्य सुचित्रा कुलकर्णी यांच्या फेसबुक वरून

Wednesday, 16 May 2018

What is meditation

Sometimes when you meditate, you just can't meditate. This is how meditation teaches you humility, acceptance and perseverance...

Sometimes when you meditate for ten minutes, it feels like an hour. This is how meditation teaches you patience and even makes your life longer...

Sometimes when you meditate for an hour, it feels like a few minutes. This is how meditation enables you to get through difficult times quickly...

Sometimes when you meditate, you get answers to your questions. This is how meditation awakens your intuition and natural wisdom and fills you with the confidence to face life...

Sometimes when you meditate, you are no longer sure who or what you are. This is how meditation liberates you from your stories and narrow sense of identity...

Sometimes when you meditate, you completely lose track of time and space. This is how meditation makes you ageless and timeless...

Sometimes when you meditate, nothing happens. This is how meditation reduces expectations and allows you to enjoy life as it is, being and doing things for their own sake...

Sometimes meditation continues after you have meditated. This is how your whole life becomes filled with the clarity and ease of meditation...

~ Harih Aum ~

Tuesday, 24 April 2018

I want more

No matter how close, you are always too far
My eyes are drawn everywhere you are

I’m tired of the way we both pretend
Tired of always wanting and never giving in
I can feel it in my skin, see it in your grin
We’re more. We always have been.

Think of everything we’ve missed.
Every touch and every kiss.
Because we both insist.
Resist.

Hold your breath and close your eyes
Distract yourself with other guys
It’s no surprise, your defeated sighs
Aren’t you tired of the lies?

Think of everything we’ve missed.
Every touch and every kiss.
Because we both insist.
Resist.

No matter how close, you are always too far
My eyes are drawn everywhere you are

I’m done. I won’t ignore.
I won’t pretend or resist.

I want more.

Excerpt From: "Faking It" by Cora Carmack. 

Quotes Collection

Sometimes I wonder if madness isn’t a reprieve from sanity.

Follow every Rainbow till you find your dream

If it doesn't make you sweat and feel a little crazy in your head, it isn't worth doing.

Anyone who thought sunshine brings happiness, had never danced in the rains.